Latest Post

 



सोनल बशीरे

      📝 📝

उल्हासनगर महानगर पालिका ट्रॅफिक पोलीस यांच्या संयुक्त कारवाईने केबी रोड वरील चार चाकी   गाड्यावर कारवाई केली जाते..दंड ही वसुल केला,जातो..

परंतु नंतर काही तासातच सदर कार विक्री आणी घरेदी करणारे व्यापारी परत् तुटे गाड्या उभ्या,करतात..आणी पोलीस...महानगर पालिका प्रशासनाची इज्जत काढतात..अनेक,वेळा हे व्यापारी प्रभाग अधिकारी यांच्याशी हमरितुमरीवर् येऊन.. तोंडची दादागिरी करतात...

परंतु ये रे माझ्या मागल्या सारखा,प्रकार नेहमी चालतो....

17 सेक्शन चौक मोबाईल गल्ली। इथे तर लोखंडी ग्रील टाकून दुकानदारानि सदर जागेचा 7/12 काढल्यासारखे वागतात..यांच्यावर कारवाई कधी होतच नाही..प्रभाग अधिकारी या रस्त्यावरून रोज नेहमी ये जा करतात..परंतु वातानू कुलीत गाडीची काच खाली येत नसेल...त्यामुळे काही दिसत नाही.....उल्हासनगर शहरात अनेक ठिकाणी फुटपाथ गिळंक्रुत् केला गेला आहे..त्याचे सगळ्यात मोठे उदाहरण.कॅम्प तीन येथून,स्टेशन कडे जाणरा रस्ता ..दोनीही बाजूच्या दुकानादारांनी फुटपाथ वरती पुतळे उभे करून रस्ता 8 फुटाचा केला.आहे..येणारे जाणारे नागरिक.रिक्षा चालक मोटर चालक यांना नागरिकांना धक्के देत गाड्या चालवाव्या लागतात..अनेकदा इथे मारमाऱ्या झाल्या,आहेत..परंतु हे दुकानदार आपली,मुजोरी सोडत नाहीत। अनेकदा पालिका अधिकारी यांना सांगून ही,टाळाटाळ का केली जाते,याचे उत्तर आदरणीय आयुक्त अजीज शेख यांनी द्यावे..

सदर स्टेशन जवळील फुटपाथ मोकळा,करून नागरिकांना बहाल,करावा अशी जोरात मागणी केली जात आहे..

आता आयुक्त साहेब यावर कारवाई करतात की...दुकानदारासाठी ती जागा.बहाल.करतात हे पाहणे गरजेचे आहे..

सद्या तरी कित्येक वर्ष हा फुटपाथ दुकांदारांनी हडप केला.आहे..

...

🌈🌈

             दी पॅन्थर टाइम्स

🌈🌈

 महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल रात्री डोंबिवली येथे धाड टाकून टँकर माफी्यांना चाप दिला,


सोनल बशीरे

7499543446

🔏🔏

गेल्या सहा महिन्यापूर्वी खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबतच्या बैठकीमध्ये डोंबिवली करांना ज्या मध्ये 26 गावे देखील आहेत,त्यांना मुबलक पाणी मिळावे म्हणून सूत्र हलविली गेली,,परंतु गेल्या 15/20 दिवसांमध्ये पाणी मिळत नसल्याच्या तक्रारी सन्मानीय उदय सामंत यांना मिळाल्या,,.तत्परतेने मंत्री महोदयांनी काल रात्री अचानक पणे धाड टाकून चार जागी टँकर माफीयांच्या मुस्क्या आवळल्या,आणी जिल्हाधिकारी,प्रांत,पोलीस प्रशासनास आदेश दिले की सदर पाणी कंपन्यावर कारवाई कराव्यात,,.डोंबिवली येथे अनेक कंपन्या विना परवाना पाणी विक्रीचा व्यवसाय करत आहेत,एमआयडीसी,आणी महानगर पालिकेचे पाणी चोरी करून यांचे उद्योग सर्रास चालु आहेत,यांच्यावर दंडात्मक् कारवाई करण्याचे आदेश मंत्री महोदय यांनी केले आहेतच,सोबत अश्या पाणी माफिया आणी पाणी चोरावराती सातत्याने कारवाई केली जाणार.हे त्यांनी स्पष्ट केले,,

माहीत असावे की.सन्मानीय उदय सामंत यांनी नुकतेच उल्हासनगर महागरपालिकेचे थकलेले बिल,जे एम डी सी ला भरायचे होते.ते 500 करोड चे बिल माफ करून समस्त उल्हासनगर वासियांचे हिरो झाले आहेत..

ज्या प्रमाने मध्यरात्री टँकर आणी पाणी माफीयावर धडक कारवाई करत सन्मानीय उदय सामंत यांनी डोंबीवली करांना दिलासा दिला.त्याचप्रमाने उल्हासनगर मधील देखील टँकर आणी पाणी माफीयाला

अर्थात चोरांवरति देखील कारवाई करून उल्हासनगर च्या जनतेला देखील दिलासा द्यावा.जेणेकरून पाणी चोरांना चाप बसेल,,

ज्ञात असावे की सन्मानीय मंत्री महोदयांनी 365दिवस् अश्या प्रकारच्या कारवाई चालू राहतील अशी ग्वाही माध्यमांशी बोलताना दिली,,

 सारा गाव मामाचा एक नाही कामाचा..

कैलास साबळे

      📝📝

या म्हणीच्या अनुसार उल्हासनगर महानगरपालिकेचा कारभार् चालू आहे...


मागील महिन्या भरापासून उल्हासनगर महा नगर पालिकेचे मा,आयुक्त अजीज शेख यांच्या भेटी घेण्यासाठी बाळासाहेबांची शिवसेनेतेतील पदाधिकारी,आणी आमदार बालाजी किणीकर सातत्याने हजेरी लावत आहेत,आता तर स्पर्धा चालू झाली आहे..आमदार कुमार आयलानी,आमदार गणपत गायकवाड,.. आणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा पंचम कलानी,यांनी देखील आयुक्तांशी भेटून चर्चाच केली,. शहरात अनेक राजकीय पक्ष आहेत,ज्यामध्ये आंबेडकरी विचारांचे देखील राजकीय पक्ष आहेत,परंतु, सध्या त्यांचे राजकारणातील आस्तित्व लोप पावत आहे,गटातटात असलेले आंबेडकरी पक्ष यांचा प्रशासनावरील वचकच मुळात मृत पावला आहे,



नागरिकांच्या समस्या सोडवण्यात सर्वच पक्ष हतबल आहेत,कारण जनतेच्या हक्कासाठी लढण्याकारिता स्वतः निस्वार्थ असणे गरजेचे आहे..शहरातील अनेक अडचणी आणी विकास यावरती लढण्याकरिता शहरातील नगदसेवक्/सेविका असमर्थ आहेत्, कारण तडजोडीवर पंचवार्षिक दिवस काढलेले ,कोणत्याही मुद्द्यावर आक्रमक होऊ शकत नाहीत,.नगरसेवक पदाचा कार्यकाल संपला असल्याने आता फक्त व्यक्तिगत संबंधाने कामे करू पाहत आहेत, राहिली गोष्ट आमदारांची तर शहरासाठी ते कितपत आक्रमक आहेत,ते धोकादायक इमारतिच्या मुददयावरुनच सार्वजनिक झाले आहे ...उल्हासनगर महानगर् पालिकेतील चार ही प्रभागातील अधिकारी आणी नोडल अधिकारी, अनधिकृत बांधकाम थांबवण्यास असामर्थ आहेत,मुळात ते चार ही अधिकारी शहरातील नेत्यांना आणी आमदारांना जुमानत् नाहीत.त्यामुळे बेकायदा बांधकाम चालूच राहतील,ज्यामध्ये अनेक नगद्सेवक लिप्त आहेत, 


पाण्याच्या प्रश्नावर सगळेच लोकप्रतिनिधी हतबल आहेत,त्यांना पाणी.वितरण विभागातील कोणताच अधिकारी आणी कर्मचारी भाव देत नाही..

आयुक्त साहेबांच्या बैठकीमध्ये आमदार बालाजी किणीकर यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणी नगर रचनाकार यांना खडे बोल सुनावले,त्यावेळी सोळंके,आणी मुळये यांनी एकदुसऱ्यावर खापर फोडून आमदार किणींकर यांच्या प्रश्नांना केराची टोपी दाखवली.आरोग्य आणी स्वच्छता यावर तर बोलूच नये.

शहरात सगळीकडे कचऱ्याचा ढीग लागलाय,परंतु नगद सेवकांनी ( क ) मिशन टेबलखाली बाळगल्याने त्यांना बोलता येत नाही,,..

मुद्दा आहे,आयुक्तांच्या भेटी गाठी चा..लोकप्रतिनिधी कोरोना काल सोडला तर ,,काय करत होते?...

सन्मानीय आयुक्त साहेब सध्या तरी शहरा साठी नवीन आहेत,परंतु आल्यापासून आपल्या कर्मचारी आणी अधिकारी यांच्याशी समन्वय साधून अनेक कार्याला गती दिली आहे,.रोखप्रतिनिधी आजा ही फंडासाठी एरझाऱ्या मारत आहेतच,..



जनतेच्या कामासाठी 5 वर्षात किती वेळा पालिकेत आले हा संशोधनाचा विषय आहे,.

(क) मिशन साठी सार्वजनिक बांधकाम खात्यात पडून असणारे नगदसेवक जनतेसाठी काय काम करू पाहत आहेत,याकडे ही आयुक्तांना लक्ष केंद्रित करने गरजेचे आहे

 अमृतसर, 17 ऑक्टोबर 2022.


सोनल बशीरे,

✍️✍️

 ग्लोबल शीख कौन्सिल (GSC) ने आज मुख्यमंत्री भगवंत मान यांना पंजाबींसाठी नोकर्‍या राखीव करण्याबरोबरच सक्तीने आणि प्रलोभनेद्वारे धर्मांतराला फौजदारी गुन्हा म्हणून घोषित करणारा कायदा करण्याची विनंती केली.


 “21 व्या शतकातील सिखी” या परिषदेत 14 देशांच्या GSC सदस्यांनी एकमताने हा ठराव मंजूर केला.




 डॉ कंवलजीत कौर, जीएससीचे प्रमुख, म्हणाले की ते पंजाबमध्ये होत असलेल्या अनैतिक धर्मांतराबद्दल शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती (एसजीपीसी) आणि राज्य सरकारसह शीखांना सावध करत आहेत.


 त्या म्हणाल्या की एक सर्वसमावेशक अहवाल आधीच मुख्यमंत्र्यांना सादर करण्यात आला आहे आणि सरकारने सक्तीच्या धर्मांतरांविरुद्ध कायदा आणावा कारण आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी २०२२ च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान असे आश्वासन दिले होते.



 SGPC प्रमुख हरजिंदर सिंग धामी यांनी सदस्यांना आश्वासन दिले की ते GSC ने उपस्थित केलेल्या मुद्द्यांवर वैयक्तिकरित्या विचार करतील आणि त्यांच्या अंमलबजावणीसाठी काम करतील.


 GSC ने उपस्थित केलेले काही मुद्दे धर्मप्रचाराशी संबंधित होते, विशेषत: प्रचारकांचे प्रशिक्षण, धर्मांतर, शीख वारशाचे जतन, नानकशाही कॅलेंडरची अंमलबजावणी, शिक्षण, आरोग्यसेवा आणि गरजूंच्या रोजगारासाठी निधीचे वाटप्..इत्यादी...

माध्यमाना माहिती देताना अनमोल सिंग माथारू यांनी येणाऱ्या काळात शीख समजातिल् विध्यार्थ्यांना शैक्षिणिक क्षेत्रात येणाऱ्या अडचणी दूर करण्याबाबत कार्यशील राहण्याची ग्वाही दिली..

✍️✍️✍️

दी पँथर टाईम्स

सम्पर्क--8007961970


 

उल्हासनगर आणी पप्पू कलानी, एकच समीकरण आहे,शहरवासियांसाठी,,पप्पू कलानी यांच्याबद्दल मिडीया मधे     इतके काही लिहिले गेले आहे ,दाखवले गेले की त्याची मोजदाद करता येणार नाही, नेहमी चर्चेत असणारे नाव म्हणजे कलानी कुटुंबीय,उल्हासनगर मध्ये कलानी कुटुंबियाशिवाय राजकारण होऊच शकत नाही,सत्तेत असो,विरोधी बाकाबर असो, कलानी हे नाव असणारच,,,उल्हासनगर वासियांसाठी पप्पू कलानी म्हणजे एक पर्वच असतो,शहभरातीलच नव्हे अनेक शरातील त्यांचे चाहते त्यांना शुभेच्छा देण्यासाठी कलानि महल् कडे धाव घेत असतात,,,अनेक वर्षांच्या तुरुंगवासा नंतर,हे पहिलेच वर्ष होते,ज्यावेळी पप्पू कलानी यांना आपल्या सर्वच चाहत्या सोबत वाढदिवस सोहळा साजरा करण्याची संधी मिळाली होती,,,अनेक अडचणी,कठीण काळ, सुटलेले भरवश्याचे सोबती,तुरुंगवास,जन्मठेपीची शिक्षा,,इतके सर्व सोसने हे सामान्य व्यक्तीचे काम नाहीयेचं,,कदाचित खचून जाने, हे पप्पू कलानि यांच्या शब्दकोषातच नाही,,, विरोधकांसाठी संपलेला पप्पू कालानी हा राखेतून निघून आकाशात झेप घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखा गगन भरारी घेत परत स्थिरावला,,,अनेक विक्रम त्यांच्या नावावर असतील,परंतु कधीही चेह्ऱ्यावर नकारात्मकता अथवा हास्य झाकले दिले नाही,प्रत्येकाला आपलेसे करून घेण्याची किमया याच व्यक्तीकडे,,शहरात कोण मोठा,कोण पदावर,याला काही महत्व नाही, सगळे वलयं पप्पू कालानीकडेच्,,,, आजच्या वाढदिवसाला माजी मंत्री, मोठे नेते,यांच्यासोबत,तलागळातील सामान्य कार्यकर्ता यांचा अफाट सागर आपल्या *साहेबाला* शुभेच्छा देण्यासाठी ताटकळत होता,,तरुण मुलापासून ते वयोवृद्ध ,,आणी महिला वर्ग यांचा प्रचंड सहभाग होता,,,..,

आपल्या वडिलांच्या गैरहजेरीत किल्ला सांभाळणारा त्यांचा पुत्र ओमी कालानी आज कित्येक वर्षानंतर त्यांच्या दोघांच्याही मित्र मांडलीसोबत आजच्या वाढदिवसाच्या सोहळ्यात आनंदोत्सव साजरा करत होते, दिवंगत ज्योती कालानी यांच्या आठवणीं त्यांनी क्दाचित याप्रसंगी सार्वजनिक केल्या नसतील,परंतु त्यांच्या आठवनिने डोळ्याच्या कडा नक्किच पानवल्या असणार,,,

असो,,,

आजच्या वाढदिवसा मुळेच नव्हे परंतु पप्पू कालानी उल्हासनगर मधील वास्तव्याने शहरातील जन तेच्या अपेक्षा वाढल्या आहेत,कारण गेल्या दोन दशकात शहराचा विकास थांबलाच आहे,,त्यामुळे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत पप्पू कालानी यांनी जनतेचे सेवक यांना संधी द्यावी हिच वाढल्या बाळगत आहेत,,,.,आणी याच अनुषंगाने आज अनेक इच्छुक उमेदवारांनी शहरभर् बॅनरबाजी करून मी किती मोठा चाहता आहे हे दाखवण्याचा केविलावना प्रयत्न केले होते, ..

काही का असेना पपू कालानी हे महाराष्ट्रातील नेत्यामधे सगळ्यात चर्चित नाव आहे, यात दुमत नाही,,सगळ्यात महत्वाचे तरुणाईला लाजवेल अशी राहणीमांन जपणारा हा अंग्रीयंगमॅन आजही 16 वर्षाच्या पोरासारखा चपळ आहे,,

शेवटी जाता जाता,, लिहिण्यासारखे खूप काही आहे,परंतु शब्द अपुरे पडतील, ,

चकली सारखी गोल गोल स्वाक्षरी करणारे पप्पू कालानी भूतलावरिल् अदभुत् किमयागार आहे,,.

,,,

➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️➡️


दी पॅन्थर टाईम्स.

कार्यकारी संपादिका- सोनल बशीरे

संपादक- कैलास साबळे

संपर्क - 8007961970

🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️🖥️

 

कैलास साबळे,,

📝📝

उल्हासनगर मधील राजकारणातील केंद्र बिंदू असलेल्या कलानी समर्थकामधील अनेकांनी आता आपली वाट बदलण्यास सुरवात केली आहे, मागील वेळेस व्यापारी संघटनेचे दीपक छतलानी यांनी भाजपा प्रवेश करून कलानी गटाला जय महाराष्ट्र केला होता,,, महाराष्ट्र मधील सत्ताबदलांनातर त्यात अजूनच भर पडली आहे, अनेकांची पावले कमळाकडे वळली आहेत,,,त्यातल्या त्यात आता भर  पडली आहे, नगरसेविका,आणि समाजसेविका,शिक्षणक्षेत्रातील नावाजलेले नाव रेखा ठाकूर यांचे पती रविश वलेचा यांची भारतीय जनता पार्टी मध्ये प्रवेश,, कलानी गटातील समर्थकांमध्ये रेखा ठाकूर यांचे भारदस्त वजन आहे, शहरातील अनेक सामाजिक कार्य, आणि अनेक क्षेत्रातील त्यांचे कार्य ,शहरात प्रसिद्ध आहे, तळागाळातील लोकांपर्यत त्यांचा संपर्क उल्लेखनीय आहे, नक्कीच या गोष्टीचा प्रभाव पडणार आणि रवीश वलेचा मुळे कार्यकर्ते वाढणार, सध्या कार्यकर्त्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष माजी आमदार पप्पू कलानी, यांच्या लोकप्रियतेमुळे अग्रेसर असला तरीही, भाजपा रवीश यांच्या पक्ष प्रवेशामुळे नक्कीच आपले वजन वाढवणार, त्याला कारण एकच आहे विध्यार्थी,,, आणि विध्यार्थी संघटना काय असते ते सांगण्याची गरज नाही,,।, रेखा ठाकूर अनेक शाळा आणि कॉलेजच्या संचालिका आहेत,हे महत्वाचे आहे,,,

कालच्या रवीश वलेचा यांचा पक्षप्रवेशा वेळी,भारतीय जनता पक्षाचे उल्हासनगर मधील सिंधी समाजाचे नेते, आणि माजी नगरसेवक महेश सुखरामांनी, अध्यक्ष जमनू पुरस्वानी,यांच्या अध्यक्षतेखाली गृहनिर्माणमंत्री रवींद्र चव्हाण,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत पार पडला,, यावेळी उल्हासनगर मधील माजी नगरसेवक टोनी सीरवानी,राजेश वधारिया,प्रकाश माखिजा,शेरी लुंड,अमर लुंड,अजित सिंग लबाना,दीपक छतलांनी,आणि फाईल फेम प्रदीप रामचंदानी उपस्थित होते,,,



 कैलास साबळे,

📝📝

केंद्रीय निवडणूक आयुक्त मा,राजीव कुमार,

सन्मानीय, लोकशाही मध्ये निवडणुक ही अत्यंत मह त्वाची प्रक्रिया आहे, निवडणूकी मध्ये उतरण्यासाठी ,समाजसेवक/सेविका यांच्यासोबत ज्यांचा जनहिताशी सुतराम संबंध नसतो, असे आयराम गयाराम आणि अनेक व्यावसायिक प्रतिस्पर्धी मैदानात उतरतात आणि साम, दंड, भेद,यांच्या जीवावर जनतेला नको असणारे देखील निवडणुकीत यश संपादन करतात,मतदाता यांना ,लुभावून, वेळ प्रसंगी धमकावून, बूथ अपहरण करून, एक ना अनेक क्लुप्त्या लढवून नकारात्मक लोकं देखील पंचायत समिती पासून ते खासदारकी पर्यंत झेप घेतात, सगळेच बलशाली आणि दबंग नसतात,, परंतु अनेक दबंग आणि असामाजिक तत्व राजकारणात आता पाय रोवू लागले आहेत, देशाच्या प्रत्येक गावापासून ते प्रत्येक शहरापर्यंत आता हे चित्र दिसत आहे,

निवडणुकी प्रक्रिये मध्ये उमेदवारास अर्ज भरताना अनेक बाबी निवडणूक आयोगास लेखी स्वरूपात द्याव्या लागतात ज्या मधे,

*मतदार यादीत नाव असल्याचा पुरावा*

*आधार कार्ड ची प्रत*

संपत्तीचे विवरण(प्रतिज्ञापत्र)

सन 2001 नंतर तीसरे अपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र

मनपा चा ठेकेदार नसल्याचे प्रतिज्ञापत्र

महानगरपालिकेचे नो ड्युवस प्रमाणपत्र

आरक्षित जागा असेल तर जात प्रमाणपत्र

दोन वर्षापेक्षा जास्त शिक्षा झाली असल्यास निवडणूक लढवता येत नाही

इत्यादी,

  ,मुद्दा हा आहे की, उमेदवार हे निवडणूक आयोगास माहिती देतात, या मध्ये ते पात्र झाल्यास निवडणूक लढतात, अथवा अपात्र झाल्यास निवडणूक लढवता येत नाही,, परंतु मतदान हे जनतेला करायचे असते..

ज्या प्रमाणे उमेदवार निवडणुकीत स्वताचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी घोषणा पत्र बनवतात त्यामध्ये उमेदवारांच्या संपत्ती सोबत किती गुन्ह्यात दोषी आणि किती न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आहेत हे देखील क्रमप्राप्त करावे जेणेकरून मतदाता कोणाला मतदान करतोय, आणि कोणत्या पक्षाने अश्या गुन्हेगारास निवडणूक लढण्यास तिकीट दिली हे सार्वजनिक होईल,,, अश्यामुळे जर असे गुन्हेगार उमेदवार जिंकून आले तर,जनतेला ही पश्चाताप करायची गरज पडणार नाही की ,त्यांनी गुन्हेगारास आपल्या मर्जीनुसार मतदान केले,,

सन्मानीय आयुक्त साहेब, नोकरी साठी कॅरेक्टर प्रमाणपत्र द्यावे लागते तसेच, निवडणुकीत उभे राहणाऱ्या उमेदवारास ही कॅरेक्टर प्रमाणपत्र क्रमप्राप्त करावे, लोकशाही वाचवण्यासाठी आपण ही हातभार लावावा ही नम्र विनंती,,,

संपर्क फ़ॉर्म

नाम

ईमेल *

संदेश *

Blogger द्वारा संचालित.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget